एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील कसुरवाही येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा टप्पा-२ अंतर्गत कृषी जनजागृती मशाल दिंडी प्रदर्शनी व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या थाटात संपन्न करण्यात आले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मशाल दिंडी व प्रबोधन कार्यक्रमाचा शुभारंभ (दि. २४ एप्रिल) गुरुवारी सायंकाळी सात वाजता गावातून मशाल फेरी काढून करण्यात आला आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी अरुण वसवाडे, व मंडळ कृषी अधिकारी एच के राऊत यांनी मशाल दिंडीचे नेतृत्व केले, दिंडीचे विसराजन करून घेतलेल्या सभेत मार्गदर्शन करतांना कृषी अधिकारी अरुण वसवाडे यांनी शेतकऱ्यांना शेती विषयक योजना व लोकसहभागातून सूक्ष्म नियोजनाची माहिती दिली.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी निवडलेल्या गावांमध्ये कसुरवाही या गावाचा समावेश असल्यामुळे पाच दिवशीय विशेष कार्यक्रमाचे आयोजिन इथे करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची माहिती देतांना त्यांनी प्रकल्पाचे उद्दिष्ट , श्रमदान, भूमहीन शेतकऱ्यांसाठी कृषी जोड व्यवसाय, कुक्कुटपालन शेळीपालन दुग्ध व्यवसाय, मृदा व जलसंधारण कामां संदर्भात मार्गदर्शन केलेलोकसभागाचे महत्त्व आणि सूक्ष्म नियोजनाच्या विविध उपक्रमाविषयी सखोल मार्गदर्शन केले, गावकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मंडळ कृषी अधिकारी एच के राऊत यांनी दिली.
कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच अंतू नरोटे, कृषी सहाय्यक जी एस हिचमी, कृषी सहाय्यक एल पी मट्टामी टेक्का, एस एम गेडाम, पाणलोट सचिव एस डी गोटा, पाटील रमेश नरोटे, राजेंद्र तिरकी, ग्रामसभा अध्यक्ष हेर्मोन तिघा, रेणू हिचामी, व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामसभा सचिव शामराव नरोटे, सिताराम कोरामी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.