News34 chandrapur
मुंबई – मागील अनेक दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्ये करीत चर्चेत असलेले बागेश्वर धाम चे प्रमुख धिरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा नवा वाद उभा केला आहे.
संपूर्ण देश व राज्याचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबा विरोधात अपमानजनक टिप्पणी शास्त्री यांनी केली आहे, त्यांच्या या वक्तव्याला राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवीत शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले शास्त्री?
जबलपूर येथील एका कार्यक्रमात शिर्डी च्या साईबाबांची पूजा करावी की नाही असा प्रश्न उपस्थित एका भाविकांने शास्त्री यांना केला, त्यावर शास्त्री यांनी उत्तर देत हिंदू धर्माचे शंकराचार्य यांनी साईबाबा यांना ईश्वराचे स्थान दिले नाही, शंकराचार्य यांचं मत हे परखड असते, ते मानायला हवे.
गिधाडांची चामडी पांघरून कुणी सिंह होत नाही, संतांची पूजा करायची असेल तर हिंदू धर्मात अनेक संत आहे, साईबाबा हे संत व फकीर असू शकतात पण ईश्वर नाही.
आमदार रोहित पवार यांनी बागेश्वर धाम चे धिरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून निवडणुका जवळ आल्या त्यावेळी अशे भोंदू बाबा पुढे येत वादग्रस्त वक्तव्य करतात. हेच भाजप पक्षाचे महत्वपुर्ण धोरण आहे.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी महाराजांचे थोतांड असल्याचे म्हणत धीरेंद्र शास्त्रींवर परखड टीका केली आहे. ते रविवारी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
विखे पाटील बोलताना म्हणाले की,अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आव्हान ते स्विकारू शकत नाहीत.बाबालोक देवाचे रूप घेऊन लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करताहेत.अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहीजे. हेच बाबा धार्मिक तेढ निर्माण करताहेत, सामाजिक अशांतता निर्माण करताहेत. साईबाबांनी माणसांमध्ये देव बघितला होता. साईबाबांनी ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा आणि सबुरीचा’ महामंत्र जगाला दिलाय. कुणाच्या श्रद्धेवर चिखलफेक करण्याचा अधिकार कुणालाही नाही. महाराष्ट्र संतांची भूमी आहे.संतांनी समाज उभा करण्याचं काम केलंय. त्या संतांमध्येच आम्ही देव बघतो. तथाकथित महाराजांनी वाचाळपणा बंद झाला पाहिजे. तुम्हाला काय धर्माचा प्रचार करायचा तो चार भिंतीत करा. दुसर्याचा अवमान करण्याचा अधिकार नाही. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे देखील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.