चंद्रपूर जिल्ह्यात शेकडो नागरिकांवर मधमाशांचा हल्ला

मधमाशांचा हल्ला

News34 chandrapur

चंद्रपुर :- जिल्ह्यातील सिंदेवाही  शहरातील स्मशानभूमीत मधमाशांचा हल्ला झालाची घटना घडली, मृतदेह सरनावर ठेवत असतानाच मधमाशांनी हल्ला केल्याने अंत्ययात्रेतील 22 नागरिक जखमी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात मधमाशांनी हल्ला केल्याची दुसरी घटना आहे. शहरातील महाकाली नगरी परिसरात राहणारे राजू मार्तंडवार यांचे निधन झाले. यांची प्रेतयात्रा  दुपारी वेळेस स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करिता नेण्यात आली. स्मशानभूमीतील सरण रचले गेले व विधी सुरू झाली होती त्यानंतर मृतकाच्या प्रेताला अग्नी द्यायची बाकी असताना दुपारी 1 वाजता दरम्यान मधमाशांनी हल्ला केला.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नातेवाईक व नागरिकांनी , महिला ,पुरुष लहान मुले हल्ला झाल्याने वाटेल तसे पळ काढला होता काही नातेवाईकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने जखमी झाले मधमाशांचे काटे अंगाला ,मांडीला ,हाताला , मानेला चावा घेऊन रुतलेले होते. मधमाशांनी भरपूर जणांना चावा घेतलेला होता. मृतकाचे सरनावरचे रचलेले प्रेत तसेच ठेवलेले होते. सर्वांनी मिळेल तिथे आसरा घेतला व वाहने सोडून लांबवर उभे राहून लक्ष देत राहिले.
स्मशानभूमीच्या परिसरात मधमाशांचा वावर सुरूच होता. ग्रामीण रुग्णालयात 40 जखमींना   उपचाराकरिता भरती करण्यात आले होते. मधमाशांनी हल्ला केल्याने काटे रुतलेले होते ते काढण्यात आले. मधमाशांनी चंदू श्रीकुंडवार व प्रदीप अटकापूरवार गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार दुपारी 4 वाजता नंतर करण्यात आले.