पूरपरिस्थितीची केली पाहणी, जलदगतीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला दिले निर्देश,
भामरागड;(गडचिरोली)
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन अनेक कुटूंबाच्या घरांची पडझड व शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, सदरच्या पुरपीडित शेतकरी व नागरिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाचे तातळीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे.
जिल्ह्यात (ता. ०८ सप्टेंबर) रविवार पासून सतत तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नदी व नाले पुराच्या पाण्याने दुथळी भरून वाहून नदी व नाल्यांच्या तीरावरील गावे व शेतीचा परिसर पाण्याखाली गेला होता. सदरच्या पुरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. पर्लकोटा नदीला आलेला पुराचा पाणी गावात शिरल्याने अनेक कुटुंबांचे मोठा नुकसान झाला आहे. गेली तीन ते चार दिवस या तालुक्याचा जिल्हा जगाशी संपर्क तुटला होता. सध्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरला असून आलापल्ली ते भामरागड हा मार्ग रहदारीसाठी सुरू झाला आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मरावबाबा आत्राम हे पुरस्थिती बाबतची माहिती भ्रमणध्वनी द्वारे संपर्काने नागरिकांकडून घेत होते. (ता. १३ सप्टेंबर) शुक्रवारी त्यांनी नागपूरहून थेट भामरागड गाठून पूर परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने भरपाई देण्यासाठी जलदगतीने पंचनामे करण्याचे निर्देश नामदार आत्राम यांनी दिले प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम, नायब तहसीलदार रेखा वाणी, नायब तहसीलदार मोरेश्वर मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार, जेष्ठ कार्यकर्ते सब्बर बेग मोगल व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.