चंद्रपुरात एक सही संतापाची मनसेचे अभियान

गढूळ राजकारणावर मनसेचे अभियान

News34 chandrapur

चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या नेत्यांच्या कोलांटउड्या बघता राजकीय वातावरण गढूळ झाले आहे, हे चित्र बघता नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या वातावरणात चंद्रपूर मनसेने एक सही संतापाची हे अभियान राबविले आहे, शहरातील जनता कॉलेज चौक परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियान शनिवार दिनांक ८ जुलै व रविवार दिनांक ९ जुलै रोजी महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील जनता महाविद्यालय चौकात मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात सदर उपक्रम घेण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनी सध्याच्या सुरू असलेल्या राजकीय परस्थिवर रोष व्यक्त करीत एक सही संतापाची या उपक्रमात सही करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

सुरू असलेल्या या अभियानाच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.