नामदार आत्राम आयोजित मेळाव्यावर ब्राह्मणवाडे आक्षेप?
गडचिरोली;
लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही पराभवाची चिन्हे दिसू लागल्याने भाजप व मित्रपक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत आहेत. मागील निवडणुकीत सुरजागडच्या माध्यमातून गडचिरोली च्या तरुणांना रोजगारा देण्याचे आश्वासन फोल ठरले असून पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षत्रातील आदिवासी तरुणांना रोजगार देण्याच्या भुलथापा सत्ताधारी पक्ष कंपनी प्रशासनाच्या मध्यातून देत आहे. त्यांच्या या चालिला बेरोजगाराची तरुण फसणार नाहीत, असे परखड मत गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रसिद्धी प्रत्रकातून मांडले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने लोहखनिजावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री धर्मराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ब्राह्मणवाडे यांनी ही टीका केली आहे.
सुरजागड लोहप्रकल्प उदघाटन प्रसंगीही झाले मोठमोठे आश्वासन देण्यात आले होते, गडचिरोली च्या 40 तरुणांना ट्रॅक देण्याबाबत सांगण्यात आले. भव्यदिव्य कार्यक्रमात त्यांना ट्रॅक च्या सिम्बाल रुपी चाब्या देण्यात आल्या. यासाठी त्यांना एक लाख रुपये बँकेत ठेवायला सांगितल्या गेले. या तरुणांना केवळ चाब्या दिल्या. ट्रॅक साठी ही मंडळी महिनोमहीने हेलपाटे मारत होती. तरुणांना आश्वासन देण्याचा हा प्रकार मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळेवर करण्यात आला होता. आताही विधानसभा निवडणूक लक्षात घेता पुन्हा तरुणांचा खोटी आश्वासन देण्याचा प्रकार करण्यात येत आहे. असे महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधीना वगळणे.
हा अपमान सहन केल्या जाणार नाही.
(ता.१७ जुलै) बुधवारी सुरजागड इस्पात कंपनीच्या लोहखनिज प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन केले गेले आहे. त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापन्यात आल्या आहेत. मात्र या पत्रिकेत गडचिरोली खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे नाव वगळन्यात आल्याचेही निदर्शन त्यांनी नोंदविले आहे, गडचिरोली जिल्यातील १६ लाख लोकांचा अपमान झाला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सदर कंपनी ही भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना फायदा करून देण्याच्या हेतूने काम करीत आहे, असे नमूद करून जनप्रतिनिधिंचा अपमान करणाऱ्या कंपनीला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.