प्रतिष्ठित राजय्याजी कंदीवार यांचे दीर्घ आजाराने निधन,

बाजारपेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली!

एटापल्ली; (गडचिरोली)
येथील नाभिक समाज संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष प्रतिष्ठित नागरिक राजन्ना उर्फ राजय्या बकय्याजी कंदिवार (वय 75) यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.

कंदिवार हे गेले काही दिवसांपासून मधुमेह आजाराने ग्रस्त होते, (ता.०३ सप्टेंबर) मंगळवारी मध्यरात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे नातेवाहिकांनी त्यांच्या प्रकृतीवर उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ तुपेश उईके यांना घरी बोलावून घेतले होते. मात्र वैद्यकीय उपचार सुरू करण्यापूर्वीच रात्री दोन वाजता दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, मृत्यू पश्चात राजय्या बकय्याजी कंदिवार यांना पत्नी, चार मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. राजय्याजी कंदीवार यांच्या दुःखद निधनावर स्थानिक व्यापाऱ्यांकडून (ता. ०४ सप्टेंबर) बुधवारी सकाळीपासून बाजारपेठ पूर्णतः बंद ठेऊन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. अंत्यविधी (०५ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता दरम्यान एटापल्ली ते आलापल्ली रोडवरील डुम्मे नाला घाटावर केला जाणार आहे.